मुंबई : राज्यात राष्ट्रवादी,शिवसेना आणि कॉंग्रेस हे एकत्रित येत महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. मात्र गेल्या काही दिवसांपासून सचिन वाझे प्रकरण परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब यामुळे सरकार कुठेतरी अडचणीत आले आहे. यावरून महाविकास आघाडीत खटके उडायला सुरवात झाली आहे.
अशातच, गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याचे वृत्त पसरले होते. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने ही भेट झाली नसल्याचं अंगात हे वृत्त फेटाळून लावलं आहे.
तर, गृहमंत्री अमित शाह यांनी मात्र यावर सार्वजनिकरित्या बोलण्यास टाळल्याने या भेटीचं गूढ अधिकच वाढलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी देखील भाष्य केलं आहे. त्यांनी ही भेट झालीच नसल्याचं म्हटलं आहे. तसेच, ‘भाजपशी कोणत्याही प्रकारची जवळीक नसून आमची विचारधारा वेगळी आहे. यामुळेच पवार साहेबांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी स्थापन करण्यात आली आहे. या चर्चांमध्ये काहीही अर्थ नसून महाविकास आघाडी भक्कम आहे.’ असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- मंत्र्यांनाच जर जनतेच्या भावना समजत नसतील तर ते चूक करत आहेत; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर
- ‘नजरचुकीने झालेली चूक १२ तासात सुधारली पण ‘ती’ घोडचूक कधी सुधारणार ?’
- दोन हजाराची लाच मागणारा लाचखोर अभियंता एसीबीच्या जाळ्यात!
- …म्हणून प्राजक्ता नंतर आता वीणा जगतापने सोडली ‘आई माझी काळुबाई’ मालिका
- लॉकडाऊनबाबत तूर्तास निर्णय नाही, मात्र… राजेश टोपेंनी केलं सूचक भाष्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
