अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्याने शेतकरी मोठा अडचणीत सापडला आहे. कांद्याच्या निर्यात बंदीचे पडसाद राज्यात उमटले आहेत. कांद्याच्या निर्यात बंदीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, तर अनेक ठिकाणी या निर्यात बंदी विरोधात आंदोलनही करण्यात आले आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवावी यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक व नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर कृ.उ.बाजार समिती समोर केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यांत आले.
यावेळी तहसिलदार प्रशांत पाटील यांना निवेदन देण्यात आले. मोदी सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान होणार आहे. तसेच केंद्र सरकारने केलेली कांद्यावरील निर्यात बंदी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारी आहे. तरी केंद्र सरकारने तात्काळ निर्यात बंदी उठवावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, शहराध्यक्षा अर्चनाताई पानसरे, शहराध्यक्ष लकी सेठी, युवक तालुकाध्यक्ष गणेश ठाणगे, शहराध्यक्ष योगेश जाधव, भाऊ डाकले, डाॅ.विलास आढाव, दिपक चव्हाण, भागचंद औताडे, राजेश बोर्डे, निरंजन भोसले, सोहेल शेख, हर्षल दांगट, रोनित घोरपडे, विलास ठोंबरे, उदय साबळे यांच्यासह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:-
- माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण
- पवारांच्या भेटीनंतर शिवसेनेने भूमिका बदलली, शेतकरी विधेयके संसदीय समितीकडे पाठवण्याची मागणी ?
- मराठा समाजाचे ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण
- ‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांनीच रचला ‘महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा कट!’ गृहमंत्र्यांनीच केला धक्कादायक खुलासा
- शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुढाकार, एकमुखाने पाठिंबा द्या – चंद्रकांत पाटील


