मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडण्याचा प्रयत्न काही पोलीस अधिकाऱ्यांनीच केला होता, असा धक्कादायक खुलासा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा गौप्यस्फोट केल्याने आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. खुद्द गृहमंत्र्यांनी असे विधान केल्याननंतर आता अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्याचा पोलीस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला होता. चार ते पाच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. यात एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता. हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर तो वेळीच थांबवला गेला,” असे अनिल देखमुखांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी बजावली मोठी भूमिका!
“शरद पवारांनी एका महिला अधिकाऱ्याचे नाव घेऊन त्यांना तातडीने पदावरून बाजूला करा, त्यांच्याकडे दुसरे काम द्या असे सांगितले होते. तसेच्या त्यावेळी एका नेत्याने चारही अधिकाऱ्यांची नावेही सांगितली होती. हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर तो वेळीच थांबवला गेला,” असेही अनिल देशमुख म्हणाले. आता त्या महिला अधिकारी कोण? आणि त्यांनी सरकारलाच थेट धारेवर धरण्याएवढे धाडस नक्की कोणत्या गोष्टींना हाती धरून केलं? असे अनेक मोठे प्रश्न निर्माण होत आहेत.
त्या अधिकाऱ्यांची बदली!
“नुकत्याच झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये त्यातील अधिकाऱ्यांची बदली केली गेली. तर काही अधिकाऱ्यांना आजही त्यांना महत्त्वाची पदं दिली आहेत,” असे गृहमंत्री अनिल देशमुखांनी स्पष्ट केले असले तरी आता हे अधिकारी कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात आंबेडकरवादी पक्षांनी स्वतःचं अधःपतन आणि हसू करून घेतलं – संजय राऊत
- मराठा आरक्षणावरुन भाजपने राजकारण करु नये, तर त्यांनी साथ द्यावी – बाळासाहेब थोरात
- माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण
- पवारांच्या भेटीनंतर शिवसेनेने भूमिका बदलली, शेतकरी विधेयके संसदीय समितीकडे पाठवण्याची मागणी ?
- मराठा समाजाचे ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

