औरंगाबाद : पैठण शहरातील वाढती वाहतुक तसेच नागरिकांना शहरातील मार्ग शोधण्यासाठी होणारा त्रास पाहता नगर परिषदेने शहरातील विविध चौकात दिशा दर्शक फलक लावण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या लिगल सेलचे एड. सुभाष खडसन यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
पैठण शहराला धार्मिक तथा पर्यटन व पुरातन नगरी म्हणुन अनन्य साधरण असे महत्व आहे. त्यामुळे शहरात पर्यटक भक्त भाविक यांचा राबता असतो. अश्या वेळेस दिशादर्शक फलक नसल्याने बाहेरगावातुन आलेल्यांची मोठी अडचण होत आहे.
त्यासाठी रस्ता अनुदानातुन शहरातील प्रमुख चौका-चौकात दिशा दर्शक फलक बसवने हे जनहिताचे ठरणार आहे, निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, नगरअध्यक्ष, मुख्य अधिकारी, तहसिलदार यांना देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- संभाजीराजेंची गादी श्रेष्ठ, त्यांनी भाजपच्या खासदारीला लाथ मारायला हवी- हर्षवर्धन जाधव
- मनगढत कहाण्या बनविण्याचं काम सुरू, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला – नाना पटोले
- हे राजपुत्रांनी राजपुत्रांसाठी चालवलेलं सरकार, भाजप आमदाराचा आरोप
- ‘नाना पटोलेंची भूमिका सरकारला सुरुंग लावणारी’ ; अजितदादांचा आक्रमक पवित्रा
- ‘काँग्रेसने ज्या शिवसेनेला पाळलं, त्यांच्या प्रमुखांनीच पाळत ठेवली हे किती वाईट!’; भाजप नेत्याची बोचरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

