🕒 1 min read
औरंगाबाद : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या नावे निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये जिल्ह्यात झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचा उल्लेख करत मदत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले की, ‘या महिन्यात मुसळधार आणि अति मुसळधार पाऊस झाल्याने काढणिस आलेला सोयाबीन, मुग, उडीद, भूईमुग, बाजरी, मका, कपाशी, तूर तसेच भाजीपाला यामध्ये मेथी, कोथिंबीर, टोमॅटो, वांगी यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सरासरीच्या दिडपट पाऊस झाल्याने धरणे, पाझर तलाव, सिमेंट बंधारे तसेच नद्या दुथड्या भरुन वाहू लागण्याने पुराचे पाणी शेतात पसरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.’
काही ठिकाणी विहीरी ढासळल्या असून, घरांची पडझड झाली आहे. तरी अद्याप पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात त्वरीत ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार हजार रुपयांची आर्थिक मदत करावी. या निवेदनावर प्रदेश सरचिटणीस एकनाथ गवळी, पांडुरंग तांगडे, शिवाजी गावंडे, विलास मगरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- नर्सिंग ‘एएनएम’ अभ्यासक्रमांची उद्यापासून परीक्षा; मराठवाड्यातील २० केंद्रावर बैठक व्यवस्था
- ‘ही नौटंकी असली तरी मोदींनी यांना कुठून कुठपर्यंत आणले आहे’, राणे यांची बोचरी टीका
- येऊ कशी तशी मी..’फेम अन्विताचा ट्रेंडिग गाण्यावरचा दिलखेच ‘ठूमका’
- शेतकऱ्यांची चेष्टा केल्याप्रकरणी मंत्रिमंडळातून वडेट्टीवार यांची हकालपट्टी करा- लोणीकर
- ‘साहेब, आमची दिवाळी गोड करा; शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून मन सुन्न झाले’, फडणवीसांच्या भावना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
