🕒 1 min read
मुंबई : क्रुझ ड्रग्स आणि आर्यन खान प्रकरणात अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यात खंडणी वसुली, लाचखोरी आणि बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी मिळवल्याच्या आरोपाचा समावेश आहे. या प्रकरणात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेणार असल्याचं मलिक म्हणाले होते. त्यानंतर आज मलिक यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर आता मलिक उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले.
मी दोन दिवस परभणी आणि नांदेडच्या दौऱ्यावर असताना, ज्या काही घडामोडी या क्रुझ ड्रग्ज केसमध्ये झालेल्या आहेत. एका पंचाने प्रतिज्ञापत्राच्या माध्यामातून जो सगळा प्रकार समोर आणलेला आहे, हे धक्कादायक आहे. मी जे आरोप करत होतो, त्यात कुठं तरी भर देणारा हा प्रकार आहे, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.
ज्याप्रकारे मी अगोदरच जाहीर केलं होतं की, दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्र्यांना मी भेटणार आहे. आज दोघांना भेटून या प्रकरणी एसआयटी चौकशीच्याबाबत मी त्यांच्याशी बोललो. गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या प्रकरणात बऱ्याच लोकांनी तक्रारी केल्या आहेत. पोलीस विभाग त्याचा तपास करत आहे. तपास करून निश्चितरूपाने यामध्ये गुन्हा दाखल करून त्यावर कारवाई होईल, असं मला आश्वासन देण्यात आलेलं आहे, असं मलिक म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला; वानखेडे प्रकरणी चित्रा वाघ आक्रमक
- देवस्थान जमीन घोटाळ्यातील आरोपी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघावचा अटकपूर्व जामीन फेटाळला
- फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्याविरोधात सबळ पुरावे; राज्य सरकारची कोर्टासमोर माहिती
- ‘मोठे लोकही फाटलेले कपडे घालतात का..’म्हणणाऱ्या नेटकऱ्यांकडून जॅकलिन झाली ट्रोल
- आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांकडूनही सुधारित तिकिटाच्या रक्कमेची आकारणी केली जाणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
