मुंबई : देशात सध्या रेमडेसिवीर या औषधाचा तुटवडा आहे. अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गरज आहे.या पार्श्वभूमीवररुग्णांचे नातेवाईक रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी भटकत असून त्याचा काळाबाजार होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका, नाही तर कारवाई केली जाईल, अशी धमकी केंद्राने औषध विक्रेत्या कंपन्याना दिल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मंत्री नवाब मलिकांनी ट्विट करत, रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या १६ कंपन्यांना महाराष्ट्र सरकारनं विचारलं असता त्यांनी केंद्र सरकारने महाराष्ट्राला औषधं पुरवू नका असं सांगितल्याचा खळबळजनक दावा केला आहे. जर या कंपन्यांनी महाराष्ट्राला औषधं पुरवली तर त्यांचा परवाना रद्द करू अशी धमकी केंद्र सरकारने कंपन्यांना दिल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे.
मलिक यांच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली असून त्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. नवाब मलिक यांच्या या आरोपांवर आता भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची प्रतिक्रिया आलेली आहे. ‘नवाब मलिकांनी जे आरोप केलेत ते पूर्णपणे निराधार आहेत. जर नवाब मलिकांकडे याचे पुरावे असतील तर आरोप सिद्ध करावेत अन्यथा माफी मागावी. सध्याच्या घडीला महाविकास आघाडी सरकारनं दोषारोप करणं थांबवावं आणि कठीण काळात स्वत:चं काम करावं असं त्यांनी सांगितले आहे.’ असे ट्विट करत नवाब मलिक यांना उपाध्ये यांनी आव्हान दिले आहे.
Instead making such wild and baseless allegations, Nawab Malik should provide proof or else should apologise. It is a high time that MVA stops blame game and does its job of handling the pandemic https://t.co/OFxTqS7gJV
— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 17, 2021
तसेच नवाब मलिक यांचे मत हा राज्य सरकारचा अधिकृत पवित्रा आहे का? तसे असल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुढे येऊन वस्तुस्थिती स्पष्ट करायला हवी. किंवा मंत्र्यांना असे बेजबाबदार आणि निराधार आरोप करण्यास रोखावे असंही केशव उपाध्ये म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या २० लाख रेमडेसिवीरच्या कुपी विकायला परवानगी मिळेना ?
- ‘रेमडेसिवीर इंजेक्शन कंपन्यांना महाराष्ट्राला साठा देऊ नये म्हणून केंद्राने धमकावले’
- शिवभोजन थाळीसाठी काँग्रेसचा ‘श्रेयवाद’, मुख्यमंत्र्यांचा फोटो डावलत प्रसिद्धीचा प्रयत्न
- कोरोनाचा कळंब आगाराला लाखोचा फटका, मागील दोन दिवसांपासून बस फेऱ्या पूर्णतः बंद
- ‘पुण्यात वीकेंड लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवेतील दुकानं बंद राहणार’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

