🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा राणा दाम्पत्यांनी केली होती. त्यानंतर शिवसेना व राणा दाम्पत्य यांच्यात चांगलाच गदारोळ झाला. युवा सेनेने रवी राणा आणि नवनीत राणा यांच्याविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी राणा दाम्पत्याला त्यांच्या राहत्या घरातून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी अटक केली होती.
त्यानंतर असलेल्या नवनीत राणा यांनी कोठडीत अनुसूचित जातीची आहे म्हणून भेदभाव करणारी वागणूक दिली, असा आरोप करत लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले होते. या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. नवनीत राणा यांच्या तक्रारीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने अहवाल मागवला आहे. राज्य सरकारला असे पत्र पाठवण्यात आले आहे. यापूर्वी लोकसभा सचिवांनी देखील राज्य सरकारला पत्र पाठवले होते.
नवनीत राणा काय म्हणाल्या होत्या ?
“मी केवळ मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर हनुमान चालिसा म्हणायची परवानगी मागितली होती. कोणत्याही धार्मिक भावना भडकावण्याचा माझा हेतू नव्हता. मी मुख्यमंत्र्यांना म्हटलं होतं की, तुम्हीही या, मात्र यामुळे कदाचित कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून मी सांगितलं की मातोश्रीवर जाणार नाही. त्याऐवजी माझ्या खारमधील राहत्या घरीच हनुमान चालिसा म्हणणार आहे.”
“पोलिसांनी मला २३ तारखेला अटक केली. रात्रभर खार पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं. त्यावेळी मी अनेक वेळा पिण्यासाठी पाणी मागितलं. तरी मला रात्रभर पाणी दिलं नाही. मला धक्का तर तेव्हा बसला जेव्हा मला पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मी अनुसुचित जातीची असल्याने त्यांच्या भांड्यात पाणी मिळणार नाही, असं सांगितले. हा सरळसरळ माझा जातीवरुन केलेला अपमान आहे, मला रात्रभर बाथरुमही वापरु दिलं नाही. अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेत मला शिवीगाळ केली गेली. अनुसुचित जातीच्या लोकांना आम्ही आमचं बाथरुम वापरु देत नाही असे ते म्हणाले,” असा थेट आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
