Share

“इतकी भीती का?”, औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू करण्यात आल्यानंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी १ मे रोजी औरंगाबाद येथे सभा घेण्याची घोषणा केली होती. परंतु, आता या सभेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली असून २६ एप्रिल ते ९ मे या काळात औरंगाबादमध्ये पोलिसांनी जमावबंदी चा आदेश काढला आहे. त्यामुळे राज ठाकरेंची सभा रद्द होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच पोलिसांच्या या निर्णयामुळे आता नवीन वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आता या मुद्द्यावर मनसेकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी यासंदर्भात ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘राजसाहेबांची संभाजीनगरची सभा होवू नये म्हणून नादान सरकारचे किती प्रयत्न? परवानगीसाठी आडकाठी, आता जमावबंदी. इतकी का भीती? तुम्ही कितीही थांबण्याचा प्रयत्न केला तरी ही हिंदुत्वाची पर्वणी सुरुच राहणार’, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, मनसेनं या सभेचा एक टीझरही प्रकाशित केला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीटरला हा टीझर शेअर केला असून टीझरमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला आहे. तसेच चलो संभाजीनगर अशी घोषणाही त्यांनी दिली आहे. या टीझरमध्ये राज ठाकरेंच्या सभेतील काही वक्तव्यांचा वापर करण्यात आला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!