🕒 1 min read
औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी १ मे रोजी औरंगाबाद येथे सभा घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी या सभेची जोरदार तयारी सुरु केली असल्याचे पाहायला मिळत आहे. असे असतांनाच आता या सभेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली असून २६ एप्रिल ते ९ मे या काळात औरंगाबादमध्ये पोलिसांनी जमावबंदी चा आदेश काढला आहे. त्यामुळे राज ठाकरेंची सभा रद्द होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच पोलिसांच्या या निर्णयामुळे आता नवीन वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात बोलत असतांना शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती औरंगाबादचे पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली आहे.
चला संभाजीनगर pic.twitter.com/AE06KuFwb7
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 26, 2022
दरम्यान, मनसेनं या सभेचा एक टीझरही प्रकाशित केला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीटरला हा टीझर शेअर केला असून टीझरमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला आहे. तसेच चलो संभाजीनगर अशी घोषणाही त्यांनी दिली आहे. या टीझरमध्ये राज ठाकरेंच्या सभेतील काही वक्तव्यांचा वापर करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “हिंदुत्व म्हणजे धोतर आहे का?”, विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचा खोचक सवाल
- “राम मंदिर बांधण्याचा आदेश कोर्टाने दिला, यांनी तर फक्त…”, मुख्यमंत्र्यांचा भाजपला अप्रत्यक्ष टोला
- कोरोनाचा हाहाकार! वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर PM मोदी घेणार बैठक
- IPL 2022 PBKS vs CSK : धवन जोडीची कमाल..! चेन्नईचा अजून एक पराभव; पंजाबनं ११ धावांनी मारली बाजी!
- IPL 2022 PBKS vs CSK : ६ वर्षानंतर आयपीएल खेळणाऱ्या ऋषी धवननं का लावली होती face shield? वाचा कारण!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
