Share

नाशिक ऑक्सिजन दुर्घटना : ‘आरोग्यमंत्री राजेश टोपे जाबाबदारी स्वीकारणार का ?’

Published On: 

मुंबई : नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या पाईप लाईनला बुधवारी (दि. २१) साडेबारा वाजेच्या सुमारास गळती लागली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गळती आटोक्यात आली असून वैद्यकीय सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये आधीच ऑक्सिजनची कमालीची कमतरता आहे. गंभीर बाब म्हणजे या रुग्णालयात गंभीर प्रकृती असलेले सुमारे १२० हुन अधिक रुग्ण हे व्हेंटिलेटर व ऑक्सिजनवर होते. आतापर्यंत या दुर्घटनेमुळे ऑक्सिजन अभावी २२ रुग्णांचा मृत्यू झाला असून हा आकडा अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे प्रकरण गंभीर असून तब्बल २ तास ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने परिस्थिती विदारक असल्याचं दिसून आलं.

दरम्यान, या दुर्घटनेननंतर आता अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नाशिक दुर्घटनेसह याआधी घडलेल्या दुर्घटनांमध्ये ज्या रुग्णांना प्राण गमवावे लागले त्यांची आकडेवारी सादर करत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे जबाबदारी स्वीकारणार का ? असा सवाल केला आहे. ‘ऑक्सिजन पुरवठा मध्ये त्रुटी, महाराष्ट्रात नाशिक हॉस्पीटल २२ कोविड रुग्णांचे मृत्यू. १२ एप्रिल नालासोपारा येथे ६२ मृत्यू, १० एप्रिल ठाणे येथे २६ रुग्णाचा जीव धोक्यात, १९ एप्रिल मुंबईत १६३ रूग्णांना हलविले…. आरोग्य मंत्री राजेश टोपे जबाबदारी स्वीकारणार का??’ असं ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!