Share

दोन वेळच्या जेवणासाठी देखील केंद्राला पत्र लिहून मागणी करतील; राणेंचा ठाकरेंवर प्रहार

Published On: 

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील सुरु आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांनी केंद्राकडे बोट केलं असून विरोधी नेते मात्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून, राज्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठा करावा, हवाईमार्गाद्वारे इतर राज्यातून ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा, हाफकिन संस्थेमध्ये कोरोना प्रतिबंधक लस निर्माण करण्यास मान्यता द्यावी, कर्जाची हप्ते वसुली थांबवावी, गरीब-गरजूंसाठी आर्थिक मदत घोषित करावी, आदी मागण्या केल्या आहेत.

दरम्यान, ‘राज्य सरकारने केलेल्या मागणी प्रमाणे केंद्राने रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात थांबवली, हाफकिनला लस निर्मिती करण्याची मान्यता दिली असे सर्वच निर्णय केंद्र सरकार करत आहे. हे फक्त मागणी करत आहेत. उद्धव ठाकरे मृत्यूची आणि बाधितांची घोषणा करतात पण आरोग्य व्यवस्थेसाठी काहीच करत नाही. मुख्यमंत्री आहेत ना मग महाराष्ट्रासाठी निर्णय घ्या,’ असं म्हणत भाजप नेते व खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

‘उद्या यांच्या घरात दोन वेळच्या जेवणासाठी देखील केंद्राला पत्र लिहून मागणी करतील, आमच्या घरासाठी दोन वेळच्या जेवणाची मदत करा. राज्य चालवण्यासाठी पैसा जमा करण्याचं काम घटनेनं राज्य सरकारला दिलं आहे. जरा राज्यघटना वाचा. नुसतं मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय करताय?’ असा घणाघात राणेंनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!