Share

Narayan Rane : “युवराजांना अंगावरचे मच्छर मारता येत नाहीत अन…”; नारायण राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केल्याने सेना मोठ्या संकटात सापडली आहे. याचा धक्का महाविकास आघाडी सरकारलाही बसला आहे. शिंदे यांच्या गटात ४० हून अधिक आमदार असून त्यांनी आसाममधील गुवाहाटी येथे मुक्काम ठोकला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना आव्हान दिले आहेत. यानंतर या घडामोडींवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राणे यांनी ट्विट करत युवासेना प्रमुख आणि मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा सोडला आहे. शिवसेनेची सत्ता गेल्यात जमा. युवराजांनी धमक्या देणं बंद करावं. अंगावरचे मच्छर मारता येत नाहीत अशांच्या, ‘गुवाहाटीतील हॉटेलमधून बंडखोरांची प्रेतं बाहेर पडतील’, अशा वल्गनांवर कोण विश्वास ठेवेल? अशा धमक्या देणं हा गुन्हा होत नाही का?, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी मुंबईत शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यामध्ये बोलताना म्हणाले होते कि, बरं झाली घाण गेली. पर्यावरण मंत्री म्हणून महाराष्ट्रात घाण साचू देऊ नये हे माझं काम आहे. आता घाण साफ झाली आहे. ज्यांना मदत केली, ज्यांना उमेदवारी दिली त्यांनी पक्षाशी गद्दारी केल्याचे वाईट वाटते. बंडखोर आमदारांमध्ये जर हिंमत असती तर बंड करण्यासाठी सूरतला जाण्याची काय गरज होती? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच बंडखोरांना पुन्हा विधानभवांची पायरी चढून देणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला होता.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!