🕒 1 min read
मुंबई: संसदेत पंतप्रधान मोदींनी (PM Modi Speech) काँग्रेसवर मजुरांना तिकीटं काढून देऊन कोरोनाचा (Corona) वाढवल्याचा आरोप केला. त्यानंतर राज्यातले काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. तसेच कॉंग्रेस नेत्यांकडून राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने देखील करण्यात येत आहेत. महाराष्ट्राचा अपमान केल्या प्रकरणी मोदींनी माफी मागावी अशी मागणी कॉंग्रेसकडून करण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयासमोरच्या महात्मा गांधी पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांची मोठी फौज तिथे दिसून आली. नाना पटोले म्हणाले कोरोनाकाळात केंद्र सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले होते.
कोरोनाचा शिरकाव झाल्याबरोबर देशाच्या सीमा सील करण्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेने दिल्या असतानाही नमस्ते ट्रम्पसाठी मोदींनी त्याला विलंब केला. मुंबईत येणारी विमानसेवा बंद करण्याची मागणी केली असता त्यालाही विलंब केला. मोदींच्या नाकर्तेपणामुळेच देशात कोरोना वाढला पण त्याचे खापर मात्र ते आज दुसऱ्यावर फोडत आहेत. पंतप्रधानांनी आपले वक्तव्य मागे घेऊन माफी मागावी अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करु, असा इशारा यावेळी देण्यात आला.
महत्वाच्या बातम्या:
-
“माझे सर्व जुने सहकारी..” पॅट कमिन्सचा कोच लँगर यांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा
-
“कार्यकर्त्यांचं मन राखण्यासाठी…”; चंद्रकांत पाटलांचा त्या वक्तव्यावरून घूमजाव
-
IPL 2022: “मुंबई ईशान किशनला विकत घेण्यासाठी सगळे प्रयत्न करेल”; आकाश चोप्राचा ठोस दावा
-
“शिवप्रेमी नाराज…”; महानगरपालिका आयुक्तांवर झालेल्या शाहीफेकीवर नवनीत राणांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
