🕒 1 min read
मुंबई: राज्यातील कॉंग्रेसचे आमदार आपल्याच काही मंत्र्यांवर नाराज असल्याची चर्चा सध्या राज्यात रंगत आहे. इतकेच नाही तर हे आमदार राज्यातील काँग्रेसच्या मंत्र्यांविरोधात तक्रार करण्यासाठी थेट दिल्लीला हायकमांडची भेट घेणार असल्याचेही समोर आले आहे. आता असे असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे.
‘आमदारांनी, कार्यकर्त्यांनी हायकमांडला भेटणं हे चुकीचं नाहीये. मंत्र्यावर ते नाराज आहेत, असं माझ्यापर्यंत तर काही आलेलं नाही. राज्यात काँग्रेस एकजुटीने काम करत आहे. लोकांना काँग्रेसकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. असे पटोले यांनी म्हटले आहे.
दरम्यान नाना पटोले यांनी जरी ही चर्चा फेटाळली असली तरी, हे आमदार दिल्लीला आपली नाराजी कळवणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच पटोले यांच्याकडून या नाराज आमदारांची नाराजी दूर होत नसल्यानेही आमदार दिल्लीला जाणार असल्याची चर्चा आता रंगत आहे. त्यामुळे आता हे नाराज आमदार खरच दिल्लीला जाणार का, हे बघणे उत्सुकाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “महाभकास आघाडीला ‘क्लास पेक्षा ग्लास’ महत्वाचा”; सदाभाऊंची खोचक टीका
- आमच्या राजांनी कधीही कोणाची प्रार्थनास्थळे तोडली नाहीत- नितीन गडकरी
- महत्वाचे! आठवड्यात २ कोटी मुलांचे झाले लसीकरण
- “तुम्ही ज्या रुग्णालयाचे उद्घाटन करताय त्याचं आम्ही अगोदरच..” ममता बॅनर्जीं मोदींवर कडाडल्या
- “पंतप्रधान ओबीसी असतांना त्यांच्याकडून समाजाला अनेक आशा होत्या, परंतु…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
