Share

आमच्या राजांनी कधीही कोणाची प्रार्थनास्थळे तोडली नाहीत- नितीन गडकरी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काही दिवसांपूर्वी रायपूर येथे दोन दिवसीय ‘धर्म संसद’ आयोजित करण्यात आली होती. या धर्म संसदेत अकोल्याच्या कालीचरण महाराज(Kalicharan Maharaj) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल(Mahatma Gandhi) अपशब्द वापरले. फक्त एव्हढेच नाही तर महात्मा गांधींवर शिवीगाळ करत त्यांनी महात्मा गांधींच्या हत्येबद्दल नथुराम गोडसेचे कौतुकही केले. या प्रकरणानंतर सर्व स्तरावरून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी याविषयी भाष्य केले आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना गडकरी म्हणाले की,’अशा प्रकरणांमध्ये कायद्याला त्याचे काम करू दिले पाहिजे. हरिद्वार आणि रायपूरमध्ये जे काही घडले ते नाकारले पाहिजे आणि त्याला महत्त्व दिलं जाऊ नये. आमच्या राजांनी कधीही कोणाची प्रार्थनास्थळे तोडली नाहीत. आम्ही विस्तारवादी नसून संपूर्ण जगाचे कल्याण झाले पाहिजे, असे आम्ही मानतो. केवळ विश्वाचेच नाही, तर प्राण्यांचेही कल्याण व्हावे, असे आम्ही मानतो, हीच आपली संस्कृती आहे. म्हणूनच हा विचार मुख्य आहे. अशा परिस्थितीत कोणी विरोधात बोलले तर ती आपली मुख्य विचारधारा नाही, त्याला महत्त्व देऊ नये’, असे गडकरी म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’कायदा आपले काम करेल. ज्याला कायद्यात अधिकार आहे, तो त्याच्या आधारे करेल. आपण सहिष्णुता आणि धर्माप्रती आदर राखला पाहिजे, सर्व धर्म आणि लोक समान आहेत’, असेही गडकरी यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!