Share

“नाना पटोले नौटंकीबाज, …कॉंग्रेसनेच माफी मागावी”, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई: कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर आंदोलन छेडले होते. मात्र पोलिसांनी मध्येच त्यांना अडवले. यानंतर नाना पटोले यांनी तात्पुरते आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली आहे. यावरच आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे.

“तुम्ही सर्व इथे उत्सफूर्तपणे आलात. त्याबद्दल तुमचं स्वागत. तुम्ही असताना कुणाची हिंमत नाही या ठिकाणी येऊन निदर्शने करण्याची. पंतप्रधान मोदींनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. उलट काँग्रेसने देशाची माफी मागायला हवी. काँग्रेसने या देशाचा बट्ट्याबोळ केला आहे. नाना पटोले वगैरे हे नौटंकीबाज लोकं आहेत. त्यांना कितीही नौटंकी करू द्या. त्याचा काही परिणाम होणार नाही.”, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

दरम्यान कॉंग्रेसचा ताफा फडणवीसांच्या घरापर्यंत पोहचू शकला नाही, त्यानंतर फडणवीस यांनी बंगल्याबाहेर येऊन कार्यकर्त्यांचे आभार मानले. दरम्यान काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांना ‘सागर’ बंगल्याजवळून पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दुसरीकडे भाजप नेते राम कदम यांनी स्वतःच अपयश झाकण्यासाठी कॉंग्रेसची नौटंकी असल्याची टीका केली आहे. दरम्यान बाबुलनाथ परिसरातून भाजप कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!