Share

‘नागपूरमध्ये जन्म झालेली ताकद देशावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करते’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सध्या आसामच्या दौऱ्यावर आहेत. आसामच्या आगामी विधानसभा निवडणुका होत असल्याने देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीनिमित्ताने राहुल गांधी आसाम मध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी एका प्रचारसभेत केंद्र सरकार तसेच आरएसएसवर सडकून टीका केली आहे. ‘नागपूरमध्ये जन्म झालेली एक ताकद संपूर्ण देशावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे’ अशा शब्दांत राहुल गांधी यांनी आरएसएसला टोला लगावला आहे.

राहुल गांधी ‘देशात लोकशाहीचे पतन होत आहे. तरुण बेरोजगार आहेत. शेतकरी आंदोलन करत आहेत. सीएए सुद्धा आहे. आसामची जनता दिल्लीत आल्यानंतर त्यांनी त्यांची संस्कृती, भाषा बदलावी, अशी आपण अपेक्षा ठेऊ शकत नाही. नागपूरमध्ये जन्म झालेली एक ताकद संपूर्ण देशावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे’ असं म्हणत हल्लाबोल केला आहे. तसेच यावेळी राहुल गांधी यांनी आसामच्या जनतेला पाच आश्वासने दिली आहेत.

आसामच्या निवडनुकीचे तीन टप्प्यात मतदान होणार असून २७ मार्च रोजी पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यासाठी १ एप्रिल आणि तिसऱ्या टप्प्यासाठी ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकांचा निकाल २ मे रोजी लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!