Share

‘माझ्या आजारपणाचा फायदा घेत काकांनी कट रचला’, चिराग पासवान यांचा आरोप

Published On: 

नवी दिल्ली : बिहारमध्ये लोक जनशक्ती पक्षात सुरु असलेल्या अंतर्गत युद्धादरम्यान पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत आपल्या भावना व्यक्त केल्या. काही काळापासून माझी प्रकृती ठिक नव्हती. जे काही झालं ते माझ्यासाठी योग्य नाही. आजही औषधं घेऊन मी इथे दाखल झालो आहे, असं चिराग पासवान यांनी पत्रकारांसमोर म्हटलं.

कुटुंबातील गोष्टी बाहेर पडू नयेत. बंद दाराआड सर्व मुद्द्यांचा निपटारा व्हावा, असे वाटत होते. गेल्या काही दिवासांपासून माझी तब्येत बरी नव्हती. मी जास्त घराबाहेर पडू शकलो नाही. माझ्या आजारपणाचा गैरफायदा घेत कट रचण्यात आल्याचा आरोप चिराग पासवान यांनी केला आहे. काकांनी इच्छा व्यक्त केली असती, तर त्यांना संसदीय दलाचे नेते केले असते, असेही चिराग यांनी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीतही काकांचे असहकार्य
जेव्हा रामविलास पासवान रुग्णालयात असतानाच पक्षाला तोडण्यात येण्याची कुणकुण समोर आली होती. पक्षात काही जणांना संघर्ष करण्याची इच्छा नाही. बिहारमध्ये आम्ही विधानसभा निवडणुका नितीश कुमार यांच्यासोबत लढलो असतो तर बहुमत मिळालं असतं परंतु, मला मात्र नतमस्तक व्हावं लागलं असतं. विधानसभा निवडणुकीतही मला काका पशुपती कुमार पारस यांच्यासहीत अनेकांचं सहकार्य मिळालं नव्हतं, अशी खंत यावेळी चिराग पासवान यांनी व्यक्त केली.

मी घाबरणार नाही
दरम्यान, मी रामविलास पासवान यांचा मुलगा आहे. मी आधी कधी घाबरलो नाही, आताही घाबरणार नाही. जनतेचा आम्हाला पाठिंबा आहे. जनता दल युनायटेडकडून आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा दावा चिराग पासवान यांनी यावेळी बोलताना केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!