Share

“मविआने वीज नाही पण विजेचा जबरदस्त धक्का…”, अतुल भातखळकरांचे टीकास्त्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: वीजनिर्मिती घटल्याने भारनियमनाचे संकट असतानाच आता वीजग्राहकांवर अतिरिक्त बिलाचा भारही येणार आहे. या महिन्यात ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव भरावी लागणार असून त्या रक्कमेसह आता देयके ग्राहकांकडे येऊ लागली आहेत. वर्षभरातील दोन महिन्यांच्या सरासरी वीज वापरानुसार सुरक्षा ठेवीची रक्कम आकारण्यात येणार आहे. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी मविआ सरकारवर (MVA government) निशाणा साधला आहे.

“वीजनिर्मिती घटल्याने आधीच भारनियमनाची टांगती तलवार असतानाच आता वीजग्राहकांवर वर्षभरातील दोन महिन्यांच्या सरासरी वीज वापरानुसार सुरक्षा ठेवीची रक्कम आकारण्यात येणार आहे. महा लुटारू आघाडी सरकारने जनतेच्या पिळवणूकीची मर्यादा ओलांडली आहे. वीज नाही पण विजेचा जबरदस्त धक्का दिला आहे.”, असे ट्वीट अतुल भातखळकर यांनी केले आहे.

दरम्यान आतापर्यंत एका महिन्याची सुरक्षा ठेव घेण्यात येत होती. आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात ती आकारली जाते.  मात्र आता ही ठेव दोन महिन्यांची करण्यात आली आहे.  यामध्ये वर्षभरातील एकूण विजेच्या दोन महिन्यांच्या सरासरीचा विचार केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!