मुंबई : मुंबई पोलिसांच्या वतीनं पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीने मुंबई पोलिसांची नाहक बदनामी केल्याचे या याचिकेत म्हटलं आहे. तसेच मुंबई पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनीही अर्णब गोस्वामी आणि कुटुंबियांविरोधात अब्रुनुकसानीचा वैयक्तिक दावा दाखल केला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ४९९, कलम ५००आणि कलम ५०१अंतर्गत पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी मुंबई सत्र न्यायालयात हा दावा दाखल केला आहे.
रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीविरोधात मुंबई पोलिसांनी बदनामीचा खटला दाखल केला आहे. मुंबई सत्र न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मुंबई पोलिसांची नाहक बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी ते टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अडचणीत आलेले होते. तसेच देशाच्या सुरक्षेसंबंधी गुप्त माहिती पसरवली असल्याचा आरोप देखील त्यांच्यावर केला गेला होता. गोस्वामी यांच्या विरोधात काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली होती. आणि आता त्यांच्यावर मुंबई पोलिसांच्या वतीनं तक्रार दाखल केली गेली आहे. यामुळे आता त्यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्र देशा’चा इम्पॅक्ट, बातमीनंतर जलवाहिनीच्या कामाची रक्कम भरली
- रिहानाच्या ट्विटवर राहुल गांधींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, दिल्लीतील फौजफाट्यावरून मोदींवर टीका
- प्यायचे होते पाणी, पण चुकून प्यायले सॅनिटायझर; BMCचे सहआयुक्त रमेश पवारांकडून घडली चूक
- शरजील उस्मानीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी चंद्रकांत पाटलांचे थेट योगींना पत्र
- ‘एखाद्या पराक्रमी योद्ध्याप्रमाणे मुंडेंचं स्वागत होतंय, त्यांचं स्वागत करणाऱ्यांची मानसिकता तपासायला हवी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

