मुंबई – कांजूर येथील कारशेडसाठी मेट्रोला राज्य सरकारकडून मोफत जमीन दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. तसेच आरेतील कारशेडसाठी आतापर्यंत खर्च झालेला पैसा फुकट जाऊ देणार नाही. आरेत मेट्रोच्या कारशेडसाठी उभारण्यात आलेली इमारत अन्य कामांसाठी वापरली जाईल. तसेच या भागात उभारण्यात आलेले बोगदे आणि ट्रॅक मेट्रोच्या उर्वरित मार्गाशी जोडले जातील, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले
आरेतील कारशेड हलवण्याचे उद्धव ठाकरेंनी जाहीर केल्यानंतर भाजप नेत्यांनी टीकास्त्र सोडले होते. आरे मेट्रो कारशेडची जागा बदलण्याचे एकमेव कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही मुलांचा हट्ट.. करोडो रुपये वाया जाणार, नवीन परवानग्या कधी मिळतील व मिळतील की नाही माहीत नाही कारण ती जमीन भुसभुशीत (खारफुटी सारखी) आहे. किमान ५ हजार कोटी या नवीन उभारणीसाठी लागणार… आधीचे पैसे गेले,’ अशी टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली होती.
आता, कांजूर येथील प्रस्तावित कारशेडसाठी घोषणा करण्यात आलेली जमीन देखील नव्या वादात सापडली आहे. ‘मेट्रो कारशेड हलवण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्र यामुळे मुंबईकरांना त्रास होत असल्याचे आम्ही सांगितलं होतं. मिठागार आयुक्तांची परवानगी जागा नावावर करताना घेतली होती का असा सवाल आधी देखील केला होता.आज केंद्राच्या पत्राने स्पष्ट झालं आहे, अहंकाराच्या भावनेतून घेतलेल्या निर्णयाचे मुंबईकरांना दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत.’ अशी टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.
तर, ‘ मेट्रोच्या प्रकल्पामध्ये महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारची कार्यपद्धती ही तिघाडीची कार्यपद्धती आहे. विकास प्रकल्प लटकवणे, त्यानंतर अडकवणे म्हणजे जागा नावावर करताना ज्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं होत ते केलेलं नाही. आणि मग जनतेला चुकीची माहिती देऊन भटकवणे असा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला आहे’ असा घणाघातच शेलारांनी केला आहे.
तिघाडीच्या ठाकरे सरकारची नवी कार्यपद्धती… विकास प्रकल्प लटकवा, अटकवा आणि भटकवा!
मेट्रो कारशेडचे असेच चालले आहे. pic.twitter.com/Q9RLtedO13— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 3, 2020
महत्वाच्या बातम्या
- चित्रपटश्रुष्टीत ठसा उमटवणाऱ्या मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीचा आज जन्मदिवस!
- महाभकास आघाडीची मदत तर सोडा पंचनामे सुद्धा झाले नाहीत !
- सत्ता स्थापनेनंतर प्रथमच महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा रंगणार सामना
- जीव गेला तरी बेहत्तर, पण माफी मागणार नाही – मुनव्वर राणा
- महाराष्ट्रातील ‘या’ शहरात होणार कोरोनाची चाचणी मोफत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

