🕒 1 min read
मुंबई : पुणे शहरापासून अवघ्या १ तासाच्या अंतरावर असणाऱ्या लवासा सिटीला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक जात असतात. लवासा प्रकल्प गेले कित्येक वर्ष वादात अडकला आहे. पर्यावरणास हानी आणि लवासा सिटीमधील काही बांधकामांची अनियमितता यामुळे लवासा सिटी प्रकल्प बऱ्याच वेळा वादात अडकला आहे. त्यातच आज माननीय मुंबई उच्च न्यायालयाने लवासा सिटी प्रकरणातील एक निकाल दिला असून त्यामुळे शरद पवार यांना धक्का बसला असल्याचे मानले जात आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने लवासा प्रकल्पावरील एका याचिकेचा निकाल देताना पवार कुटुंबावरील आरोपांमध्ये तथ्य असल्याचं महत्त्वाचं निरिक्षण नोंदवलं आहे. आज मुंबई उच्च न्यायालयाने लवासा सिटीबाबत एक महत्वपूर्ण निकाल दिला. आज दिलेल्या निकालात पवार कुटुंबियांनी लवासा प्रकल्प अजित गुलाबचंद यांना मिळावा यासाठी प्रयत्न केल्याच्या आरोपात तथ्य असल्याचं निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. नाशिक मधील वकील नानासाहेब जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करत शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबावर लवासा सिटी प्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले होते.
त्यांनी याचिकेत म्हटलं होतं, “शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे उद्योगपती अजित गुलाबचंद यांची लवासा कंपनी आणि प्रकल्प वाचविण्यासाठीच विरोधकांचा विरोध डावलून २००५ ची कायदा दुरूस्ती करण्यात आली. तसेच ती पूर्वलक्ष्यी प्रभावानेही लागू करण्यात आली.” यामुळे शरद पवार यांचे निकटवर्तीय अजित गुलाबचंद यांना फायदा झाल्याचे या याचिकेत म्हणण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाने यावर आपले मत नोंदवले आहे. मुंबई उच्च न्यायालय म्हणाले कि, ” लवासा प्रकल्पासाठी कायद्यात केलेली दुरुस्ती योग्य आहे. परंतु पवार कुटुंबियांनी हा प्रकल्प त्यांचे स्नेही अजित गुलाबचंद यांना मिळावा यासाठी प्रयत्न केल्याच्या आरोपांत तथ्य आहे. मात्र लवासा सिटी प्रकल्प आता पूर्ण झाला असून त्याला बराच काळ लोटला आहे असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने लवासा सिटी प्रकरणातील याचिका आज कायमची निकाली काढली.
महत्वाच्या बातम्या :
- यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी मोदींकडे मागितली मदत, झेलेन्स्कि यांनी शेअर केलं ट्विट
- Russia-Ukraine War: रशियाविरोधात लढण्यासाठी युक्रेनमध्ये राजकीय नेते मैदानात, हाती घेतली शस्त्रे
- ‘नवाब मलिक जेलमध्ये आहेत, मग अजित पवार…?’ असदुद्दीन ओवैसींचा सवाल
- भारतीय लष्कर जगातील काही ताकदवान लष्करापैकी एक; असे आहेत क्रमांक
- संभाजीराजेंच्या उपोषणावर धैर्यशील मानेंच्या भावना; म्हणाले, ‘माझे राजे उपाशी असताना…’


