मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली ‘रोखठोख’ भूमिका जाहीर केली आहे. ५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाने तीव्र संताप व्यक्त केला होता. मात्र, कोरोना संकटांच्या पार्श्वभूमीवर समाजाने संयम पाळावं असं आवाहन सर्वच नेत्यांनी केलं होतं.
संभाजी राजे मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करत असताना राजकारणात आम्हाला रस नसून मराठा समाजाला न्याय द्यावा, हीच आमची मागणी असल्याचं म्हणाले. त्यानंतर ते नवा पक्ष काढण्याची चर्चा सुरू आहे. याबाबत विचारण्यात आलं असता संभाजी राजेंनी आपली भूमिका मांडली.
"जर बहुजन समाजाची इच्छा असेल तर नवा पक्ष काढण्याबाबत निश्चितच विचार केला जाईल. पण सध्या मराठा समाजाला आरक्षण देणं हाच मुख्य उद्देश आहे. त्यासाठी सारंकाही करण्याची तयारी आहे", असं संभाजी राजे म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर सभागृहात उपस्थित मराठा समाजाच्या प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे संभाजी राजे आगामी काळात वेगळा राजकीय पक्ष काढण्याच्या शक्यतेला आता दुजोरा मिळाला आहे.
दरम्यान, गेल्या चार दिवसात संभाजीराजेंनी महाराष्ट्र दौरा करून विविध भागांमध्ये जाऊन समाज बांधवांच्या भेटी व बैठका घेऊन त्यांच्या भावना समजावून घेतल्या आहेत. यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अशा अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या.
महत्वाच्या बातम्या
- ‘छत्रपती घराण्याचा वंशज हात जोडून विनंती करतोय, या समाजाला बाहेर फेकू नका’
- पुन्हा उसळणार : शरद पवार ६ जूनच्या आंदोलनाला येणार ? संभाजीराजे म्हणाले…
- राज्यातील लॉकडाऊनबाबत जयंत पाटील यांचे मोठे विधान !
- दोन अधिकारी मिळून सांभाळणार औरंगाबाद मनपाचा आरोग्य विभाग, यंत्रणेला मोठा दिलासा!
- राहुल गांधींची आजची पत्रकार परिषद ही Toolkitच्या स्क्रिप्टनुसार झाली : जावडेकर


