औरंगाबाद : जिल्ह्यात होणारे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुणे इथं हलवण्यात आले आहे. या विरोधात खासदार इम्तियाज जलील यांनी आवाज उठवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावामुळे शिवसेनेचे मुख्यमंत्री या बाबत कठोर भूमीका घेत नसल्याचा आरोपही खासदार इम्तियाज यांनी केला आहे. आता या संदर्भात २८ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षानेही या आंदोलनात सहभागी होण्याचे खुले आवाहन खासदारांनी केले आहे. इतकच नाही सर्व राजकीय पक्षांनी आपल्या शहरासाठी शहराचे नागरिक म्हणून एकत्र येण्याचे आवाहन खासदारांनी केले आहे.
औरंगाबादमध्ये होणारे आंतरराष्ट्रीय कृषी विद्यापीठ पुण्याला स्थलांतरीत करण्यासंदर्भात कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही. वास्तविक या विद्यापीठासाठी औरंगाबाद जवळील जागाही निश्चित करण्यात आली होती. असे असताना पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावामुळेच हा निर्णय झाला असल्याचा आरोपही खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. आता या विद्यापीठाच्या मागणीसाठी सर्व पक्षीय नेते कोणती भूमीका घेतात, ते तर येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.
महत्त्वाच्या बातम्या
- देशवासियांची माफी मागणाऱ्या तलवारबाज भवानी देवीला पंतप्रधानांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
- पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले विधान दुर्दैवी
- आसाम मिझोराम सीमावादातून हिंसाचार, आसामच्या 6 पोलिसांचा मृत्यू
- ‘शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत रिंग रोडची मोजणी करून देणार नाही’
- ‘मुंबई इंडियन्स ते कसोटी संघात स्थान’ अवघ्या पाच महिन्यात बदलली सुर्याचे कारकिर्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
