🕒 1 min read
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत दिलेला अल्टीमेटम संपल्यानंतर संघर्ष पेटण्याची शक्यता होती. मात्र काल राज्यातील अनेक भागांत सलोख्याचे दर्शन घडले. अनेक मशीदीवर भोंग्याविना नमाज पठन करण्यात आली. तर कुठे आवाजाची मर्यादा पाळत नियमांचे पालन करण्यात आले. या पार्श्वभूमीवरच राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (rohit pawar) यांनी ट्वीट करत राज्यातील जनतेचे कौतुक केले आहे.
कोणाच्याही चिथावणीला बळी न पडता राज्यात शांतता राखल्याबद्दल राज्यातील जनतेचे आणि पोलीसांचे मनःपूर्वक आभार! महाराष्ट्र आणि इथला सर्व समाज हा शांतताप्रिय आणि सर्वधर्मसमभाव मानणारा आहे, हे पुन्हा एकदा पहायला मिळालं. हा आपला महाराष्ट्र धर्म आणि आपली एकजूट कायम राहील, असा विश्वास आहे. असे राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी म्हटले आहे.
कोणाच्याही चिथावणीला बळी न पडता राज्यात शांतता राखल्याबद्दल राज्यातील जनतेचे आणि पोलीसांचे मनःपूर्वक आभार! महाराष्ट्र आणि इथला सर्व समाज हा शांतताप्रिय आणि सर्वधर्मसमभाव मानणारा आहे, हे पुन्हा एकदा पहायला मिळालं. हा आपला महाराष्ट्र धर्म आणि आपली एकजूट कायम राहील, असा विश्वास आहे.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 5, 2022
तसेच “धर्म, निष्ठा, श्रद्धा हे प्रत्येकाचे व्यक्तिगत विषय आहेत. त्याचा आदर सर्वांनीच केला पाहिजे. पण त्याचा कुणी राजकीय बाजार भरवत असेल तर त्यालाही रोखलं पाहिजे. महागाईपासून बेरोजगारीपर्यंत सर्वसामान्यांना भेडसावणारे अनेक प्रश्न आज देशात आहेत. त्यावर आवाज उठवण्याची आज अधिक गरज आहे.”, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है…”, जितेंद्र आव्हाड यांचा विरोधकांना जोरदार टोला
- “जे लोक देशात हिजाबपासून भोंग्यापर्यंत…”, संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल
- “घालीन लोटांगण, वंदीन चरण…”, राहुल गांधींच्या ‘त्या’ फोटोवरून राम कदम यांचा शिवसेनेवर निशाणा
- “अंधारयात्रेवर चर्चा करण्याचे सोडून राहुल गांधी नाईट क्लबात गेले यावर…”, संजय राऊत यांची टीका
- IPL 2022 RCB vs CSK : चेन्नई सुपर किंग्ज जवळपास स्पर्धेबाहेर..! बंगळुरुसमोर धोनीसेना ढेपाळली आणि…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
