🕒 1 min read
अकोला : केंद्र सरकारने स्मार्ट सिटी, अमृत योजना आदी विविध योजना जाहीर केल्या. मात्र या सर्व योजना फसव्या ठरल्या. या योजनांमुळे विकास तर झाला नाही, मात्र शहरांची अधोगती झाली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी केला. शहरात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
चव्हाण म्हणाल्या, जगात ३० शहरे सर्वात प्रदूषित आहेत. यापैकी दुर्देवाने २० शहरे आपल्या देशातील आहेत. त्यामुळेच या गंभीर बाबींवर काम करणे गरजेच आहे. मात्र यावर काम झाले नाही. केवळ योजना जाहीर करण्यात आल्या. यात स्मार्ट सिटी, अमृत योजना आदी विविध योजनांचे स्वप्न दाखवण्यात आले. परंतु या योजनांचा फायदा झाला नाही. त्यामुळे शहराचा विकास सोडा, अधोगती झाली. आता नागरिकांचा भ्रम दूर झाला आहे.
मागील निवडणुकीत एका प्रभागातून चार नगरसेवक निवडले गेले. त्यामुळे मतदारांना आपला नगरसेवक कोण, ही बाबच लक्षात आली नाही आणि सत्तेत असलेल्या पक्षाकडे पाहून मतदान झाले. मात्र आता नागरिकांची निराशा झाली आहे. त्यांना बदल हवा आहे. आमचा पक्ष ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या तत्वावर काम करतो. मात्र, अर्बन सेलमुळे पक्ष १०० टक्के समाजकारण करणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठी खासदारांसाठी हक्काचे स्थान म्हणजे गडकरींचे निवासस्थान – विनायक राऊत
- माझ्यासारख्या शिवसैनिकाला संपवण्यासाठी मंत्रिपदाचा गैरवापर; रामदास कदमांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
- खा.रजनी पाटील यांनी घेतली सोनिया गांधी यांची भेट
- शिल्पा-राज कुंद्राने शर्लिन चोप्राविरोधात कोर्टात ठोकला ५० कोटींचा मानहानीचा दावा
- ‘दोन्ही हातांनी मिळेल ते लुटायचे हीच तर राज्य सरकारातील मंत्र्याची खासियत’


