Share

मोदीजी, तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती ? प्रकाश आंबेडकरांची जहरी टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

यावरूनच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत बोचरी टीका केली आहे. जगभरात लस वाटण्याऐवजी तुम्ही पहिला भारतीयांना लस का नाही दिली ? ज्या लोकांचा कोरोनाने तडफडून मृत्यू झाला त्याची जबाबदारी मोदींची आणि केंद्र सरकारची नाही का ? असे सवाल प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे उपस्थित केले आहेत.

‘मोदीजी तुम्हाला फार उशिरा अक्कल आलीये. व्हॅक्सिन वाया घालवणे म्हणजे कोणाचा तरी जीव घेणे हे खरंय. मात्र जेव्हा सिरम आणि भारत बायोटेक व्हॅक्सिन निर्माण करत होते तेव्हा तुम्ही बुकिंग का नाही केली ? २१ जानेवारी पर्यंत का थांबलात ? जेव्हा देशात निर्मित झालेली व्हॅक्सिन तुम्ही जगभरात वाटत होता, तेव्हा हे शहाणपण कुठे गेले होते ? तेव्हा पहिला भारतीयांना लस मिळेल मग जगाला असं का नाही म्हणालात ? कोविड-१९ मुळे जे लोक तडफडून मृत्यू पावले त्यांची जबाबदारी तुमची आणि सरकारची नाही का ?’ असं रोखठोक भाष्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!