Share

मोदीजी आम्हाला आमचा जुना भारत परत द्या, काँग्रेस नेत्याने केली विनंती

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : झारखंड हे लिंचिंग आणि हिंसाचाराची फॅक्टरी झाली असून दलित आणि मुस्लिमांची दर आठवड्याला हत्या होत आहे. त्यामुळे मोदीजी तुमचा हा नवीन भारत तुमच्याकडेच ठेवा, आम्हाला आमचा जुना भारत द्या अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केली आहे. ते आज राज्यसभेत बोलत होते.

यावेळी गुलाम नबी आझाद म्हणाले की, झारखंड लिंचिंग आणि हिंसाचाराची फॅक्टरी झाली आहे. दलित आणि मुस्लिमांची दर आठवड्याला हत्या होत आहे. प्रधानमंत्रीजी आम्ही ‘सबका साथ, सबका विकास’च्या लढाईत तुमच्यासोबत आहोत. पण हे लोकांना दिसलं पाहिजे. आम्ही ते पाहू शकत नाही आहोत.

तसेच मी तुम्हाला विनंती करतो की, नवीन भारत तुमच्याकडेच ठेवा आणि आम्हाला आमचा जुना भारत परत करा. जिथे प्रेम, संस्कृती होती. जर मुस्लिम आणि दलितांना काही ठेस लागली तर हिंदूंनाही यातना व्हायच्या. जेव्हा एखादी गोष्ट हिंदूंच्या डोळ्यात जायची तेव्हा मुस्लिम आणि दलित त्यांच्यासाठी अश्रू ढाळायचे, असे गुलाम नबी आझाद यावेळी म्हणाले.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!