मुंबई : महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला दोन महिने पूर्ण होत आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार ईडीमुळं आल्याची टीका विरोधी पक्षांनी केली होती. विरोधकांच्या आरोपांना एकनाथ शिंदे यांनी उत्तर देताना हो हे ईडीचं सरकार आहे, असं म्हटलं होतं. ई म्हणजे एकनाथ शिंदे आणि डी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असल्याचं म्हटलं होतं. शिंदे यांच्या सरकारला दोन महिने पूर्ण होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसनं हल्लाबोल केला आहे. पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी कमी बॉल्सवर जास्त रन काढण्याच्या नादात ईडी सरकार लवकरच ‘रनआऊट’ होईल, असा टोला लगावला आहे. ५० खोके आणि महागाई एकदम ओके असं म्हणत महेश तपासे यांनी शिंदे-फडणवीस सरकार वर हल्लाबोल केला.
तपासे म्हणाले कि, ५० खोके आणि महागाई एकदम ओके असं अनोखं आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रभर गुरुवार १ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हाचे ठिकाणी प्रमुख शहरामध्ये तालुका स्तरावर हे आंदोलन आम्ही घेणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षची जी धारणा जेव्हा पासून मोदी सरकार विराजमान झाले आहे. तेव्हा पासून देशाची महागाई आणि देशाअंर्गत असलेली उच्चांक गाठला आहे. परंतु या सर्व प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी मोदी सरकारला वेळ नाही, ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षच सरकार आहे. तिथे आमदार बंड निर्माण करणे,संविधानीकपेचप्रसंग निर्माण करणे. तिकडचं सरकार कोसळून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आणणं. मोदी सरकारला महागाई, बेरोजगारी असल्या विषयात रस नाही. ५० खोके आणि महागाई एकदम ओके, असं शेवटी ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | राजकीय प्रदूषण बंद झालं ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
- Narayan Rane | आमदार गद्दार नसून खरे गद्दार उध्दव ठाकरेच – नारायण राणे
- Ganesh Chaturthi | कोणत्या शुभ मुहर्तावर येणार लाडके गणपती बाप्पा, कधी अन् कशी करावी पूजा, जाणून घ्या
- Kirit Somaiya | गणपतीनंतर ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराचं ‘हे’ स्मारक जमीदोस्त होणार, किरीट सोमय्या यांचा इशारा
- Shahjibapu Patil। बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांचा पाया अडीच वर्षापूर्वी उद्ध्वस्त झाला; पाटलांचा ठाकरेंवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

