🕒 1 min read
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी मन की बात या कार्यक्रमात शिंगांच्या तस्करीसाठी होणाऱ्या गेंड्यांच्या हत्येवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. २२ सप्टेंबर २०२१ रोजी गेंड्याची जप्त केलेली २४०० शिंगे जाळून टाकण्यात आली, यातून तस्करांना मोठा संदेश गेला असे नरेंद्र मोदींनी म्हटले.
२०१३ साली ३७ आणि २०१४ साली ३२ गेंड्यांची हत्या करण्यात आली होती. या आव्हानाचा सामना करण्यासाठी मागील ७ वर्षात आसाम सरकारने प्रयत्न करत गेंड्यांच्या हत्येविरोधात मोठी मोहीम राबवली. आणि २०२१ साली २२ सप्टेंबररोजी जागतिक गेंडा दिनानिमित्त तस्करांकडून जप्त करण्यात आलेले २४०० शिंगे जाळून टाकण्यात आली असल्याचे मोदींनी सांगितले.
पिछले 22 सितम्बर को World Rhino Day के मौके पर तस्करों से जब्त किए गए 2400 से ज्यादा सींगो को जला दिया गया था।
यह तस्करों के लिए एक सख्त संदेश था। #MannKiBaat pic.twitter.com/b4XVEfS4Lw
— BJP (@BJP4India) January 30, 2022
आसाम सरक्र्न्ने केलेल्या प्रयत्नांमुळे आसाममध्ये गेंड्यांच्या शिकारीत घट झाली. २०२१ मध्ये एकाच गेंड्याची हत्या झाल्याची घटना समोर आली. गेंड्याला वाचवण्यासाठी आसामच्या नागरिकांनी केलेल्या प्रयत्नाचे कौतुकही मोदींनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- राज्य सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचा हर्षवर्धन पाटलांकडून विरोध; आंदोलनाचा इशारा
- राऊत, परबांविरुद्ध न्यायालयाचा अपमान केल्याची याचिका दाखल करणार-चंद्रकांत पाटील
- ‘ठाकरे’ सरकारमुळेच औरंगाबाद एलईडीच्या झगमगाटात उजळले-अंबादास दानवे
- “२०२४ पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतामध्ये येईल”, भाजप नेते कपिल पाटील यांचे मोठे वक्तव्य
- ‘मन की बात’ एकत्र ऐकता यावी यासाठी सर्व शक्ती केंद्रावर व्यवस्था करणार-चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
