औरंगाबाद: औरंगाबाद मनसेत अनेक बदल करण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे(Suhas Dashrathe) यांना तडकाफडकी पदावरुन काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे औरंगाबाद मनसेत खळबळ उडाली असून दाशरथे समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. सुहास दाशरथे यांच्या या नाराजीची दखल घेत लवकरच त्यांना महत्वाची जबाबदारी देण्यात येणार असून यापुढे विधानसभा मतदार संघाच्या दृष्टीने जिल्हाध्यक्ष नियुक्त केले जाण्याचा निर्णय मनसेने घेतला असल्याची माहिती मनसेचे जेष्ठ नेते अभिजित पानसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना दिली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackrey) यांच्या औरंगाबाद दौऱ्यात औरंगाबाद मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांची पदावरून हाकलपट्टी करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी या बाबत निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर दाशरथे समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजीचे वातावरण पसरले आहे. समाज माध्यमांवर दाशरथे समर्थक राज ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयाला मोठ्या प्रमाणावर विरोध करतांना दिसून येत आहे.
यामध्ये चांगल्या कर्तुत्ववान माणसाची किंमत नाही तसेच नुकतेच पक्षांतर केलेल्या काहींनी या पक्षात चांगल्या लोकांना किंमत नसल्यामुळे आम्ही हा पक्ष सोडला. दाशरथे आणि खांबेकर समर्थक एकमेकांमध्ये भिडल्याचेही पाहायला मिळत आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार राज ठाकरेंनी मुंबईत मनसे नेत्यांची एक बैठक घेतली. त्यामधे सुहास दाशरथेंना नवी जबाबदारी देण्याबाबत राज ठाकरेंनी सूचना दिल्याचे अभिजित पानसे म्हणाले. पक्षाच्या दृष्टीने हे निर्णय हिताचे ठरतील असेही पानसे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना छोटी गोष्ट’; ‘या’ मुख्यमंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य
- भातखळकरांच्या ‘त्या’ टीकेवर सचिन सावंत यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, ‘इंग्रजांचे पाय…’
- द. आफ्रिका दौऱ्यासाठी शिखर धवनचा भारतीय संघात समावेश करावा; माजी क्रिकेटपटूचे वक्तव्य
- सहकारातील अडचणी दूर करण्यासाठी अमित शहांचा महाराष्ट्र दौरा- देवेंद्र फडणवीस
- …हे नाकर्ते खंडणी सरकार अजून किती विद्यार्थ्यांचा बळी घेणार आहे?- अतुल भातखळकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

