Share

…हे नाकर्ते खंडणी सरकार अजून किती विद्यार्थ्यांचा बळी घेणार आहे?- अतुल भातखळकर

Published On: 

मुंबई : आरोग्य भरती घोटाळा, पेपर फुटी प्रकरण समोर आल्यानंतर विरोधकांनी आणि विद्यार्थ्यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली होती. त्यानंतर राज्यातील म्हाडाच्या परिक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने पुन्हा एकदा राज्य सरकारचा ढिसाळ कारभार समोर आला. असे असतांनाच एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या मल्हारी नामदेव बारवकर या विद्यार्थ्याने नैराश्यापोटी आत्महत्या केली आहे, याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात भातखळकरांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा येथील एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या मल्हारी नामदेव बारवकर या विद्यार्थ्याने नैराश्यापोटी आत्महत्या केली आहे.परीक्षा रद्द करणे, पेपर फुटी, दलालांचा सुळसुळाट; हे नाकर्ते खंडणी सरकार अजून किती विद्यार्थ्यांचा बळी घेणार आहे?’, असा सवालही त्यांनी केला आहे.

दरम्यान, मल्हारी हा एमपीएससीच्या पूर्व परीक्षेची तयारी करत होता, यापूर्वी मल्हारीने दोन ते तीन वेळा पूर्व परीक्षा दिली होती, परंतु त्यामध्ये त्याला यश आले नाही. यामुळे नैराश्यात गेलेल्या मल्हारी बारवकर याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!