Share

कला शाखेच्या पदवीधारकांकडून पिकविमा कंपनीचे पंचनामे, आ. पवार यांचा गंभीर आरोप

Published On: 

नांदेड : जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई देण्यासाठी पिकविमा कंपन्या पंचनामे करत आहेत. मात्र, त्यासाठी १८ ते २० वर्ष वयाच्या मुलांचा वापर करण्यात येत आहे. या मुलांना कृषी क्षेत्रातील कामाचा कसालाही अनुभव नाही. तर काही विद्यार्थी हे कला शाखेचे पदवीधारक असून ते पंचनामे करत असल्याचा आरोप आमदार राजेश पवार यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना हे पंचनामे तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे.

या संदर्भात आमदार पवार म्हणाले की, ‘पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीमार्फत शेती नुकसानीचे पंचनामे करतेवेळी शेतकऱ्यांची खूप मोठी फसवणूक होत आहे. हे एक गंभीर प्रकरण असल्यामुळे मी सरकारला विनंती करतो की, या प्रकरणाची त्वरित चौकशी झाली पाहिजे. जो पर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत पंचनामे थांबवले पाहिजे. कृषी पदवीधारक किंवा अनुभवी विमा प्रतिनिधीकडूनच शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले पाहिजे.’

नांदेड जिल्ह्यातील शेतकरी हा पूर्णत: आर्थिक अडचणीत सापडला आहे. मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे इथल्या शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे व्यवस्थित होणे आवश्यक असल्याचे मत जिल्हा परिषद सदस्या पूनम पवार यांनी व्यक्त केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!