मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडण्याचा प्रयत्न काही पोलीस अधिकाऱ्यांनीच केला होता, असा धक्कादायक खुलासा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी हा गौप्यस्फोट केल्याने आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. खुद्द गृहमंत्र्यांनी असे विधान केल्याननंतर आता अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्याचा पोलीस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला होता. चार ते पाच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. यात एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता. हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर तो वेळीच थांबवला गेला,” असे अनिल देखमुखांनी स्पष्ट केले.
मात्र गृहमंत्र्यांच्या या विधानाचा भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘सुशांत आणि दिशा सालीयन प्रकरणात दोन महिने ज्यांना इंचभर पुढे सरकता आले नाही ते पोलीस अचानक ठाकरे सरकार पाडण्याइतके सक्षम कसे झाले? त्यांनी असे कोणते च्यवनप्राश खाल्ले हे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुलाखतीत स्पष्ट केलं तर बरे झाले असते’. असा घणाघात भातखळकर यांनी केला आहे.
सुशांत आणि दिशा सालीयन प्रकरणात दोन महिने ज्यांना इंचभर पुढे सरकता आले नाही ते पोलीस अचानक ठाकरे सरकार पाडण्याइतके सक्षम कसे झाले? त्यांनी असे कोणते च्यवनप्राश खाल्ले हे गृहमंत्री @AnilDeshmukhNCP यांनी मुलाखतीत स्पष्ट केलं तर बरे झाले असते. @MiLOKMAT pic.twitter.com/0ff3mtjYsB
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 20, 2020
महत्वाच्या बातम्या
- माणुसकीला काळिमा फासणारी घटना, येथे चोरले जातात मृतक रुग्णाच्या अंगावरील दागिने
- आता ठाकरे आडनाव बदलून ‘झोलझाल’ ठेवा, निलेश राणेंचा घणाघात
- अभिनेत्रीने अनुराग कश्यपवर केले शोषणाचे आरोप; थेट मोदींना मागितली ‘ही’ मदत
- हिवाळी अधिवेशन रद्द करावे आणि अधिवेशनावर होणारा खर्च विदर्भातील वैद्यकीय यंत्रणा सक्षम करण्यासाठी द्यावा, कोणाची आहे ही मागणी ?
- सुप्रिया सुळे आणि ठाकरे पितापुत्रांच्या अडचणीत वाढ, निवडणूक प्रतिज्ञापत्रांची फेरपडताळणी होणार ?


