फुलंब्री : देवगिरी कारखान्यावर प्रशासक नेमण्यासाठी सर्वसाधारण सभा घेण्यात आली. मात्र या सभेस सभेची मागणी करणारे आमदार हरीभाऊ बागडे अनुपस्थित राहिल्याने देवगिरीचे माजी चेअरमन जगन्नाथ काळे नाराज झाले. या सभेची मागणी करणारे आमदारच बैठकीस अनुपस्थित राहु कसे शकतात. असे काळे म्हणाले.
सर्वसाधारण सभा घेतल्याशिवाय अवसायक हटवता येत नाही व प्रशासकीय कार्यकारी मंडळही आणता येत नाही आमदार हरिभाऊ बागडे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. मात्र बैठकीला ते स्वत: गैरहजर होते. त्यांच्या गैरहजेरीत कारखाना अवसायक श्रीराम सोन्ने यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडली. यात देवगिरी सहकारी साखर कारखाना पुनरुज्जिवित करणे व संस्थेच्या देणीबाबत तडजोड करणे, अशा दोन विषयांवर एकमुखी ठराव संमत झाला. यामुळे दहा वर्षांपासून बंद कारखाना चालू होणार असल्याने शेतकरी आनंद व्यक्त करीत आहे.
देवगिरी साखर कारखान्यावर ६९ कोटी २० लाखांचे कर्ज आहे. तर कारखान्याची मालमत्ता ही १९७ कोटी ५३ लाखांची आहे. या रकमेवर चार कोटीचे व्याज प्राप्त झालेले आहे. समृद्धीचे दिलेले ३१ कोटी ३१ लाख रु. व चौका येथील कारखान्याच्या मालकीची ४२ एकर २२ गुंठे जमीन ही लिलावात विक्री केली. याचे सात कोटी ४० लाख रुपये असे एकूण ३८ कोटी ७१ लाख रुपये हे ऋण प्राधिकरण यांच्याकडे रोख रकमेत पडून आहे. यासाठी अवसायक हटवून कार्यकारी मंडळ असले तरच हे निर्णय होऊ शकतात व कारखाना सुरू होण्यास चालना मिळेल, तर दुसरा गट हा अवसायकाच्या वतीनेच निर्णय घ्या अन्यथा संचालकांची निवडणूक घ्या, अशी मागणी करीत आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज ठाकरे यांच्या भेटीसाठी विश्व हिंदू परिषदेचे नेते उद्या ‘कृष्णकुंज’वर
- कोण होणार सभागृह नेता, नांदेडकरांमध्ये उत्सुकता
- …तर बंगलूरूवर देखील आमचा अधिकार; जयंत पाटलांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
- शासनाच्या तिजोरीवर करोडोंचा डल्ला, २०१२ पासून सुरू होता प्रकार
- ‘इलाही’ यांच्या रुपाने मराठी गझलेचा आरसा हरवला-गझलकार गिरीश जोशी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

