अहमदनगर : शेत जमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धती आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या पीक नोंदणीच्या आधारित शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जाते. पण, २-३ गाव मिळून एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नाही. यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने अप्लिकेशन निर्मिती करत पिकाची रिअल टाईम नोंदणी करण्याची सुविधा थेट शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली.
टाटा ट्रस्टच्या सहायाने या ॲप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली. मोबाइल ॲप्लिकेशनमध्ये शेतकऱ्यांना पिकांची माहिती भरावी लागणार आहे. तलाठी या पिकांच्या नोंदी तपासून घेतील. यामुळे पीक पेरणीची रियल टाईम माहिती अप्लिकेशनमध्ये संकलित होऊन पारदर्शकता येणार आहे. पीक पाहणी नोंदणीत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवल्याने पीक विमा आणि पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल.
शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यासाठी सुलभता येईल. तसेच नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि मदत देणे देखील सोईचे होईल. ई-पीक पाहणीमुळे राज्यातील पिकांचे अचूक क्षेत्र कळणार आहे. यामुळे राज्यातील आर्थिक पाहणी आणि कृषी नियोजन शक्य होणार आहे.
ई-पीक नोंदणी प्रकल्प यापूर्वी प्रायोगिक तत्वावर २० तालुक्यात राबवण्यात आला. मिळालेल्या प्रतिसादामुळे राज्यभर राबवण्याचा निर्णय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतला. राज्य सरकारने आदेश देखील जारी केला. ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय सनियंत्रण समित्या गठीत करण्यात आल्या. पूर्ण वेळ प्रकल्प अंमलबजावणी कक्ष संचालक भूमी अभिलेख (पुणे) यांच्या नियंत्रणाखाली सुरू करण्यात आला. या अॅपमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे महसूलने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- हीच खरी बाळासाहेबांची शिवसेना! ‘अदानी एअरपोर्ट’ची तोडफोड करताना शिवसैनिकांचा पाहा हा व्हिडिओ
- भाजप कार्यकर्त्यांना पाहून सांगलीत मुख्यमंत्री ठाकरेंनी पळ काढला? पाहा हा व्हिडिओ..
- ‘थप्पड मारण्याची वल्गना करणारा वाघ ३०-४० लोकांना पाहून भीतीने गाडीत लपून बसला!’
- ‘राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी मोदींची परवानगी घ्यावी लागेल’, चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य
- ‘लांब फेकणारा खेळाडू टोकियोला गेला नाही, त्यामुळे भारताने गोल्डन संधी गमावली’, काँग्रेसचा टोला


