🕒 1 min read
नवी दिल्ली : 10 सप्टेंबरपासून म्हणजेच कालपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना मँचेस्टर येथे सुरू होणार होता. मात्र, अंतिम कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या मॅनेजमेंटमधील एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. तत्पूर्वी, प्रमुखांसह चार सपोर्ट स्टाफ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याच पार्श्ववभूमीवर हा सामना स्थगित करण्यात आला आहे. दोन्ही संघाची संमती घेऊन हा सामना दोन-तीन दिवसांसाठी स्थगित केल्याचे बोललं जात आहे.
मालिकेतील शेवटचा सामना रद्द झाल्यांनतर सर्वत्र गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याची दिसत आहे. भारताचे असिस्टंट फिजिओ योगेश परमार यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे भारतीय संघात भीतीचं वातावरण होतं.
मात्र, हा सामना कोरोनामुळे नव्हे तर पुढची परिस्तिथी पाहता रद्द केला आहे. असं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे सीईओ टाॅम हॅरिसन यांनी म्हटलं आहे. भारत इंग्लंड यांच्यातील सामना पुढे ढकलला तर आयपीएलला मोठा फटका बसू शकतो, असं सुचक यांनी केल्याचं वृत्त इंग्लंडमधील माध्यमांनी दिलं आहे. दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील सिरीज आता संपली आहे. उर्वरित सामना जरी खेळवला गेला, तरी सामना हा मालिकेचा भाग नसणार असल्याचं, टाॅम हॅरिसन यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- Ind vs Eng : इंग्लंडला स्वतःला विजयी घोषित करायचे होते पण…
- भारतीय खेळाडू घाबरण्यामागचं कार्तिकने सांगितलं ‘हे’ कारण
- अचानक कसोटी रद्द केल्यामुळे इंग्लंड क्रिकेटला 200 कोटींचा बसू शकतो फटका
- महाराष्ट्राला लवकर कोरोनामुक्त करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी घातले श्रीगणरायांना साकडे
- भारताची वाटचाल रशियातील एकाधिकारशाहीच्या दिशेने – पृथ्वीराज चव्हाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
