नवी दिल्ली : टीम इंडियाचे सहाय्यक फिजिओ योगेश परमार कोरोना बाधित असल्याचे आढळून आल्यानंतर भारतीय खेळाडूंचीही चाचणी करण्यात आली पण सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. भीतीमुळे कोणालाही खेळायचे नव्हते, तरी मालिकेतील अंतिम कसोटी सामना नाणेफेक करण्यापूर्वी दोन तास मागे घ्यावा लागला. भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांना आधीच कोरोनाची लागण झाली होती. भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय) आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) यांच्यातील ऑनलाइन बैठकीनंतर खेळाडूंना कळवण्यात आले की सामना रद्द करण्यात आला आहे आणि तुम्ही सर्व आपल्या रूममध्ये रहा.
भारतीय संघाच्या खेळाडूंनी खेळण्यास नकार दिल्यानंतर ईसीबी मालिकेच्या शेवटच्या सामन्यात स्वतःला विजेता मानण्यास सांगत होता, ज्यावर बीसीसीआयने आक्षेप घेत त्यांना सामान रद्द करण्यासाठी दबाव आणला. यानंतर, ईसीबीने म्हटले, ‘भारतीय संघात कोरोनाची प्रकरणे आणखी वाढण्याच्या शक्यतेमुळे भारत आपला संघ मैदानात उतरवू शकत नाही. बीसीसीआयशी चर्चा केल्यानंतर, ईसीबी ओल्ड ट्रॅफर्डमधील पाचवी कसोटी रद्द झाल्याची माहिती दिली.
पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडिया सध्या 2-1 ने आघाडीवर आहे. नंतर जेव्हा हा कसोटी सामना खेळला जाईल तेव्हा या मालिकेतील विजयी संघ निश्चित केला जाईल. हा कसोटी सामना आता कधी खेळला जाईल हे स्पष्ट करण्यात आले नसले तरी भविष्यात योग्य वेळी त्याचे आयोजन केले जाईल अशी अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बाळासाहेब थोरात यांच्या सुदर्शन निवासस्थानी पारंपारिक पद्धतीने बाप्पाचं आगमन
- महाराष्ट्राला लवकर कोरोनामुक्त करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी घातले श्रीगणरायांना साकडे
- पवारांकडून त्यांचं ‘करेक्ट वर्णन’, काँग्रेस जुन्या पुण्याईवर जगतेय- देवेंद्र फडणवीस
- महाराष्ट्राला लवकर कोरोनामुक्त करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी घातले श्रीगणरायांना साकडे
- भारताची वाटचाल रशियातील एकाधिकारशाहीच्या दिशेने – पृथ्वीराज चव्हाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

