Share

भारतीय खेळाडू घाबरण्यामागचं कार्तिकने सांगितलं ‘हे’ कारण

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना रद्द करण्यात आला. कोरोना महामारीचे संकट पाहता बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मँचेस्टर कसोटी रद्द करण्याचा निर्णय घेतला. खेळाडूंचे आरोग्य लक्षात घेऊन दोन्ही मंडळांनी शेवटचा सामना रद्द केला आणि हा सामना पुढील काही दिवसात आयोजित करण्याचे मान्य केले.

दरम्यान, इंग्लंड दौऱ्यावर भाष्य करणारा भारतीय यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने सध्या टीम इंडियामध्ये कोणतं वातावरण आहे याचा खुलासा केला आहे. दिनेश कार्तिकम्हणाला, ‘मी काही भारतीय खेळाडू बोललो. मालिकेतील सर्व सामने शेवटच्या दिवसापर्यंत खेळले गेले. सर्व खेळाडू थकले आहेत आणि संघात जवळपास एकच फिजिओ होता आणि त्याला देखील कोरोना विषाणूची लागण झाली आहे. ही एक मोठी समस्या भारतीय संघासमोर आहे. आणि म्हणूनच जेव्हा फिजिओला कोरोनाची लागण झाली तेव्हा भारतीय संघातील खेळाडू घाबरू लागले आहेत.

भारतीय टीममध्ये शास्त्रींना प्रथम कोरोनाची लागण झाली. शास्त्रींनी लंडनच्या हॉटेलमध्ये त्यांचे पुस्तक प्रकाशित केले होते त्यानंतर त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळली. या कार्यक्रमात बाहेरून आलेल्या लोकांना परवानगी देण्यात आली होती. सूत्रांनी सांगितले की रवी शास्त्रींनंतर आणखी कोरोनाची किती प्रकरणे आढळतील हे सांगता येणार नाही, त्यामुळेच खेळाडूंना विलिगिकारणात ठेवण्याची खबरदारी घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!