🕒 1 min read
बीड : बीड जवळील पारगाव जप्ती येथे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. गावातील राज वेअर हाऊसमध्ये कापसाच्या गाठी ठेवण्यात आल्या होत्या. आज मंगळवारी पहाटे लागलेल्या आगीत तब्बल ७५ कोटी रुपयांच्या कापसाच्या गाठी जळून खाक झाल्यात. बीड-जालना महामार्गावर असलेल्या पारगाव जप्ती येथे हा प्रकार घडला. १२ तासानंतरही ही आग विझवण्यास अग्निशामक दलाला यश आलेले नाही.
बीड शहरापासून जवळच पारगाव जप्ती येथे राजवेअर नावाचे हाऊस आहे. या हाऊसमध्ये मंगळवारी पहाटच्या दरम्यान अचानक आग लागली. या आगीत बुलढाणा अर्बनमार्फत ठेवलेल्या कापसाच्या 23 हजार गाठी व इतर सहा ते सात हजार अशा एकूण 30 हजार गाठी जळून खाक झाल्या आहेत. तसेच चाळीस हजार स्क्वेअऱ फुटचे गोडावून या आगीत जळून खाक झाले आहे.
ही आग एवढी भीषण होती की अग्नीशामक दलाला ती १२ तासानंतरही आटोक्यात आणण्यास यश आले नाही. बीड, औरंगाबाद आणि जालना या तीन जिल्ह्यातून अग्निशामक दलाच्या जवळपास २५ गाड्या ही आग विझवण्यासाठी दाखल झाल्या होत्या. या सर्व गाड्यांना अद्याप आगीवर नियंत्रण मिळविता आलेले नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘टेस्ट करण्यापेक्षा व्यापाऱ्यांना कोरोना लस द्या’
- हिंगोलीत जिल्ह्यात ७ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर; बाहेरगावहून आलेले ४ प्रवासी पॉझिटिव्ह
- ठिय्या आंदोलनाचा ४२ वा दिवस; ७ मार्च रोजी होणाऱ्या आक्रोश मोर्चाची जय्यत तयारी
- ‘त्या’ तरुणाचा खून समलैंगिक संबंधांतून; लग्न ठरले म्हणून पार्टनरला संपवले
- पंकजा मुंडेंच्या आक्रमक पवित्र्यानंतर धनंजय मुंडेंची मंत्रीपदासोबत आमदारकी जाऊ शकते का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
