Share

मराठी साहित्य संमेलन; जावेद अख्तर, गुलजार यांच्या नावाला ब्राह्मण महासंघाचा विरोध

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : नाशिकमध्ये ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन येत्या ३ ते ५ डिसेंबर रोजी होईल. संमेलनाचे उद्घाटक म्हणून जावेद अख्तर आणि गुलजार यांची नावे पुढे येताच ब्राह्मण महासंघाने त्याला तीव्र विरोध दर्शवल्याने संमेलनातील वादाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.

खगोलशास्त्रज्ञ, ज्येष्ठ लेखक जयंत नारळीकर यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाला अवघे २०-२५ दिवस बाकी आहे. दरम्यान, उद्घाटनासाठी जावेद अख्तर, गुलजार यांची नावे पुढे येताच ब्राह्मण महासंघाने त्याला कडाडून विरोध केला आहे. जावेद अख्तर आणि गुलजार यांचे मराठी साहित्यात भरीव योगदान असे काय आहे? असा सवाल करण्यात आला आहे.

साहित्य सृष्टीत योगदान देणारे अनेक दिग्गज आज महाराष्ट्रात असताना नेहमीच हिंदू धर्माच्या विरोधात बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या या विकृतांना बोलावून साहित्य संमेलनाचे पदाधिकारी नेमका कोणता संदेश देऊ पाहत आहेत. फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांना असाच एकदा सन्मान दिला गेला होता. आम्ही त्यावेळेस पण विरोध केला होता. आदल्या दिवसापर्यंत ठिकठाक असणारे दिब्रिटो ग्रंथदिंडीच्या वेळी आजारी पडले आणि नंतर पुन्हा मोठे भाषण करायला मोकळे होते. दिब्रिटो असो की गुलझार, जावेद अख्तर यांना अशा महत्वाच्या पदांवर बसवू नये. सन्माननीय जयंत नारळीकर साहेबांसारखा अध्यक्ष असताना वीर सावरकर यांच्या भूमीत या विकृतांच्या हस्ते हे उद्घाटन होण्यास आमचा विरोध राहील अशी भूमिका ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!