Share

‘कोणाला तरी वाचवण्यासाठी मलिकांकडून आरोपांच्या फैरी सुरू’, दरेकरांचा पलटवार

Published On: 

मुंबई : क्रूज पार्टीवरील छापा हा बनावट असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. ‘ज्या दिवशी क्रूझवर एनसीबीने छापे टाकले त्यावेळी समीर वानखेडे यांनी ८ ते १० लोकांना ताब्यात घेतले असे म्हटले होते. एकूण अकरा लोकांना ताब्यात घेतले होते आणि नंतर आठ लोकांना ताब्यात घेतल्याच्या बातम्या आल्या,’ असा गौप्यस्फोट मलिक यांनी केला आहे. ‘दिल्ली ते मुंबईतील भाजप नेत्यांनी फोन केले. या सगळ्या कटात भाजपचे नेते सहभागी असल्यानं त्यांच्या नातेवाईकांना सोडलं. समीर वानखेडे यांना भाजप नेत्यांनी फोन केल्यामुळे त्यांनी तिघांना सोडून दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘कोणाला तरी वाचवण्यासाठी नवाब मलिक सनसनाटी निर्माण करत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. ‘मलिक हे सरकारमधील मंत्री आहेत त्यामुळे त्यांच्याकडे मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस त्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे कॉल रेकॉर्ड तपासणं आणि इतर माहिती घेणं त्यांच्यासाठी सोप आहे. नार्कोटिक विभागाकडून पोलिसांकडून माहिती मिळवून ते तीर मारण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका दरेकर यांनी केली.

‘मूळ विषयापासून दूर जात कोणालातरी वाचवण्यासाठी त्यांचा सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्याकडे असलेली माहिती एजन्सीला द्या म्हटल्यावर आमचा एजन्सीजवर विश्वास नसल्याचं ते सांगतात. जर एजन्सीवर आणि न्यायालयावर विश्वास नसेल तर गंभीर आहे. समजून उमजून असे प्रकार सुरु असल्याचं स्पष्टपणे दिसत असल्याची प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!