Share

‘सोयाबीन बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करा’, शिवसेना खासदाराचे ‘महाबीज’ला पत्र

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद : खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकरी बांधव खते व बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी निविष्ठाधारक दुकानांमध्ये गर्दी करीत आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांमधून महाबीज कंपनीच्या बियाण्यांची मागणी जास्त आहे. परंतु जिल्ह्याला अद्याप मागणीनुसार पुरेशा प्रमाणात महामंडळाकडून बियाणे उपलब्ध करुन देण्यात आले नाही. महाबीजने पुरेशा प्रमाणात सोयाबीन बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशा मागणीचे पत्र खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी महाबीजच्या महाव्यवस्थापकांना दिले आहे.

पत्रात म्हटले आहे की, अपुऱ्या प्रमाणात बियाणांचा पुरवठा झाल्याने शेतकरी बांधवांना बियाणे खरेदीसाठी विविध गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः गतवर्षी सोयाबीन काढणीच्या वेळेत जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन ७० टक्के पेक्षा जास्त सोयाबीन पिकांचे नुकसान झाले होते. यामुळे यंदा शेतकऱ्यांकडे घरगुती बियाणेदेखील उपलब्ध नाही. तरी शेतकरी बांधवांना वेळेवर व पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध करुन देणे अत्यंत गरजेचे आहे.

जिल्ह्याची सोयाबीन बियाण्यांची मागणी ५० हजार क्विंटल इतकी असून, आतापर्यंत केवळ ११ हजार क्विंटल एवढे बियाणे उपलब्ध झाले आहे. सीड प्लॉटची मागणी ६ हजार हेक्टरसाठी २५०० शेतकऱ्यांनी केली आहे. त्यापैकी १२०० हेक्टर क्षेत्रासाठी १३७७ शेतकऱ्यांना मिळू शकतील इतके बियाणे उपलब्ध झाले आहे. उर्वरित शेतकरी सीड प्लॉट व साधारण बियाण्यांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. आगामी खरीप हंगामासाठी महाबीज कंपनीचे सोयाबीन बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यासंदर्भात महाव्यवस्थापकांकडे मागणी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!