मुंबई : कोरोना महामारीने मागील वर्षीपासून जगभरात थैमान घातले आहे. बऱ्याच देशांमधील कोरोना हा पूर्णपणे आटोक्यात येत असला तरी भारतात मात्र अजूनही संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका हा कायम आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रासह देशभरात हाहाकार माजवला होता. यामुळे आता निर्बंधांमध्ये सूट देताना राज्य सरकार व प्रशासन हे गंभीरतेने विचार करूनच निर्णय घेत आहेत.
यंदा देखील कोरोनाचे सावट कायम असल्याने सर्व धर्मियांनी सण-उत्सव साधेपणाने साजरे करावे असे आवाहन केले जात आहे. गेल्यावर्षी प्रमाणेच यंदा देखील गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा असं आवाहन करण्यात आलं असून राज्य सरकारने याबाबत नियमावली देखील जाहीर केली आहे. बऱ्याच गोष्टींना यात निर्बंध घालण्यात आले असून आता भाजपने सणांवरील निर्बंध कमी करून उत्सव साजरे करू द्यावेत तसेच मंदिरे खुली करावीत अशी मागणी केली आहे.
आमची भूमिका स्पष्ट आहे, नियम नियमावली करून मंदिर उघडा, प्रादुर्भाव वाढणार नाही याची काळजी घेऊन, त्याचे नियम करून गणेशोत्सव साजरा करू द्या. हिंदु सणांवर आक्रमण बंद करा! @BJP4Maharashtra @ChDadaPatil @Dev_Fadnavis pic.twitter.com/SgcTwgdrXr
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 1, 2021
आज पत्रकार परिषदेत बोलताना भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी नियम लावा पण गणेशोत्सव साजरे करू द्या, अशी मागणी केली आहे. ‘आमची भूमिका स्पष्ट आहे, नियमावली करून मंदिर उघडा. प्रादुर्भाव वाढणार नाही याची काळजी घेऊन, त्याचे नियम करून गणेशोत्सव साजरा करू द्या. हिंदु सणांवर आक्रमण बंद करा!’, असं आशिष शेलार यांनी म्हटलंय आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षण : संभाजीराजे उद्या घेणार राष्ट्रपतींची भेट; राज्यातील प्रमुख पक्षांचे ‘हे’ नेते असणार सोबत
- ‘१२ आमदारांचा’ तिढा आता तरी सुटणार का? राज्यातील मंत्री आज राज्यपालांना भेटण्याची शक्यता
- ‘आम्ही परंपरा जपतोय; राणेंच्या घराबाहेर हजारो लोक जमले तेव्हा मात्र गृहमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली नाही’
- मनोरुग्णांच्या लसीकरणासासंदर्भात हायकोर्टाकडून राज्यांना महत्वपूर्ण निर्देश
- नशीबवान ! पालघरच्या मच्छिमाऱ्याच्या जाळ्यात आले ‘खास’ मासे; मिळणार कोट्यवधीचा भाव


