Share

‘महाविकास आघाडीची शेतकऱ्यांच्या बांधावर बि – बियाणे योजना हवेत विरली’

Published On: 

परभणी : बियाणे – खत  शेतकऱ्यांच्या बांधावर मिळतील अशी घोषणा महाविकासआघाडी सरकारने केली होती.परंतु ती केली घोषणाच राहिली. या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर घोषणा न राहता शेतकऱ्यांच्या बांधावर बि – बियाणे पोहचवण्याचे काम करावे असे आवाहन जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी शनिवारी केले.

पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम २०२१ पूर्व तयारी आढावा बैठक शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बि – बियाणे हे आता लॉकडाऊन तसेच कोरोनाचा संसर्गाचा वाढता कहर तसेच संचारबंदी देखील असल्यामुळे आता शेतकरी आपल्या शेतामध्ये पेरणी करण्यासाठी बि – बियाणे कसे काय करेदी करणार असा प्रश्न सामान्य शेतकरी वर्गाला पडलेला आहे. तर महाविकास आघाडीने सर्व शेतकऱ्यांना बांधावर बि – बियाणे देण्याचे घोषीत केले होते. परंतू अद्यापही तसे होताना दिसत नाही. यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना बांधावर बि – बियाणे द्यावे जेणे करुन शेतकऱ्यांशी सोय होवू शकेल.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत येताना शेतकऱ्यांना बांधावर बि – बियाणे देणार असल्याची मोठी घोषणा ठाकरे सरकारने केली होती. परंतू आज सरकारला दीड वर्ष झाले आहे. परंतू अजुन या बाबत कोणत्याही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला नाही. तसेच या बाबतचा ठोस शासकीय निर्णय देखील घेण्यात आलेला दिसून येत नाही. त्यामुळे आता लॉकडाऊन, संचारबंदी, जमावबंदी, कोराेना माहामारीच्या पार्श्वभमूीवर शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेणे खुप महत्वाचे आहे. असेही या वेळी आमदार मेघना बोर्डीकर – साकोरे यांनी सांगितले. शनिवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या    

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!