Share

महाविकास आघाडी अनैसर्गिक; गीते यांचे विधान सत्यच-देवेंद्र फडणवीस

Published On: 

मुंबई : शिवसेना नेते अनंत गीते यांनी शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस वर टीका केल्यानंतर या विधानाने राजकीय वातावरण तापून निघाले आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. गीते यांचे हे विधान सत्य परिस्थितीवर अधारीत आहे. आघाडी अनैसर्गिक आहे हे मी पहिल्यापासून सांगतोय. असे फडणवीस म्हणाले.

शिवसेना नेते अनंत गीते आघाडी सरकारवर टीका करताना म्हणाले, राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. त्यामुळे शरद पवार आमचे नेते नाहीत. महाविकास आघाडी हि केवळ सत्तेसाठी तडजोड आहे, अशी टीका शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केली होती. या विधानाला उद्देशून भाजपा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे मी पहिल्यापासून सांगतोय की तीन पक्षांची झालेली आघाडी ही अनैसर्गिक आहे. अशा प्रकारची आघाडी कधी चालू शकत नाही. असे फडणवीस म्हणाले होते.

यापूर्वी भजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याची आणि मंत्र्याची नार्को टेस्ट करा, त्यावेळी त्यांच्यातून एकच आवाज येईल, ही युती नकोच, काँग्रेस राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने जाणं म्हणजे राजकीय आत्महत्या आहे, अनंत गीते हे मनापासून बोलत होते. असे भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!