Share

OBC Reservation : ओबीसी आरक्षणाचे श्रेय महाविकास आघाडीचे – जयंत पाटील

Published On: 

Jayant Patil । मुंबई : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जयंतकुमार बाठिंया आयोगाने त्यांच्या अहवालामध्ये ओबीसांनी स्थानिक स्वराज संस्थांमध्ये २७ टक्के पर्यंत आरक्षण देण्यात यावे अशी शिफारस केली होती. कोर्टानं हा अहवाल मान्य केल्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना २७ टक्के राजकीय आरक्षण मिळणार आहे. मात्र यानंतर यावरून राजकीय वर्तुळात आता श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षजयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जयंत पाटील यांनी ट्विट करत याबाबत भाष्य केलं आहे. जयंत पाटील म्हणाले कि, राज्यात ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास मान्यता देण्याच्या माननीय सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो. मविआ सरकारने सदर आरक्षण टिकवण्यासाठी मेहनत घेतली होती. ओबीसी समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व कायम राहावे यासाठी आम्ही प्रयत्न केले व त्यास यश आल्याचे समाधान आहे, असं ते म्हणाले.

तसेच पुढे दुसऱ्या ट्विट मध्ये जयंत पाटील म्हणतात कि, बंढीया आयोगाची स्थापना – १० मार्च २०२२ ला झाली. ९९% डाटा जमा – २६ मे २०२२ ला झालं. डाटाचं विश्लेषण आणि रिपोर्ट सादर – १० जुलै २०२२ ला सादर झाला. तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री शपथ – ३० जुन २०२२ रोजी घेतली होती. तर बंठीया आयोगाच्या रिपोर्ट आणि आजच्या निकालाचं श्रेय महाविकास आघाडीचंच आहे, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!