🕒 1 min read
दिल्ली : मुंबईमध्ये गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली आहे. सचिन वाझेंना २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात देखील मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून ते महाविकस आघाडीतील विविध नेत्यांच्या बैठका होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कालच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यानंतर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील ठाकरेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर गेले होते. दरम्यान, आज देखील विविध पोलीस अधिकारी आणि सरकारमधील नेत्यांच्या भेटीगाठीचं सत्र सुरुच आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी आज दिल्लीमधील पत्रकार परिषदेत या मुद्द्यावर महत्वाचं भाष्य केलं आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी सचिन वाझे प्रकरणावर पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. पत्रकारांनी वाझेंमुळे सरकार अस्थिर होतंय का ? असा प्रश्न केला असता, ‘एका इन्स्पेक्टरमुळे सरकारवर काही परिणाम होईल असं वाटत नाही. वाझे प्रकरणाचा सरकारवर काहीही परिणाम होणार नाही,’ असं पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- महाविकास आघाडी सरकारला मराठा आरक्षणाचं गांभीर्य नाही : चंद्रकांत पाटील
- रोजगार क्षमता असलेल्या ‘वस्त्रोद्योगा’ला बळ देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक – अजित पवार
- ‘राज्याच्या कामात केंद्राची विनाकारण ढवळाढवळ’, मंत्री अशोक चव्हाणांची टीका
- इथे तर चक्क पोलिसांनाच मारहाण करून लुटले !
- ‘माझी हत्या करुन जिंकणार आहेत काय ? याचा बदला घ्यावा लागेल’ ममतांचा अमित शहांवर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
