Share

‘महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रात आणीबाणी लागू केली’, फडणवीसांचा आरोप

Published On: 

मुंबई : भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केल्याने विधानसभेबाहेर अभिरूप विधानसभा भरवून सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या निषेधाचा प्रस्ताव मांडला आणि त्यावर चर्चा सुरू झाली. विधानसभेचा पहिला दिवस आमदारांच्या निलंबनावरून गाजला. आज दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी विरोधक सभागृहात उपस्थित राहून गोंधळ घालतील असे संकेत होते. मात्र, भाजप आमदारांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत थेट विधानसभेच्या पायरीवरच अभिरुप विधानसभा भरवण्यात आली.

भाजपने भरवलेल्या प्रतिविधानसभेविरोधात आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात तक्रार केली. विधिमंडळ परिसरात स्पीकर, माईक लावायला परवानगी कोणी दिली, असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे. त्यानंतर प्रतिविधानसभेतले माईक, स्पीकर बंद करण्याचे आदेश देण्यात आले. तालिका अध्यक्षांच्या आदेशानुसार सुरक्षा रक्षकांकडून प्रतिविधानसभेतील स्पीकर काढून घेण्यात आले.

यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ‘खोटे आरोप लावून आमच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. सभागृहाच्या खुर्चीवर बसून खोटे बोलणे सुरु आहे. शांतपणे आमचं प्रतिअधिवेशन सुरु असताना मार्शल्स पाठवून, पत्रकारांवर दंडुकेशाही करण्याचा प्रयत्न झाला आहे. महाराष्ट्रात आणीबाणी लावण्यात आली आहे. सरकारचा भ्रष्टाचार बाहेर येत आहे म्हणून सरकारने आता दडपशाही सुरू आहे. आमचे अधिवेशन तर असेच सुरू राहणार. पण ते पत्रकारांवर दंडुकेशाही करत असतील तर मात्र आम्ही प्रेस रुममध्ये आमचे आंदोलन करू असे फडणवीस यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!